3 Terrorists Killed In Encounter In Jammu And Kashmirs Shopian 
देश

काश्मीरमध्ये आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा; चकमक सुरूच

वृत्तसंस्था

जम्मू  : काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात जवान व दहशतवाद्यांमध्ये आज (ता. २९) पुन्हा चकमक झाली. काल (ता. २८) सुरू झालेल्या या चकमकीत आतापर्यंत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मेल्होरा भागात झालेल्या चकमकीत एक मेजर देखील जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शोपिया जिल्ह्यातील जैनपोर भागातील मेल्होरा गावात दोन दहशतवादी दडून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर या भागात शोध मोहीम राबवण्यात आली. दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. जवानांकडूनही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. ज्यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. जम्मू-काश्मीरमधील कुलगाममधील लोअर मुंडा परिसरात दोन दिवसांपूर्वी जवानांकडून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

जगातील अन्य देशांप्रमाणे पाकिस्तानही कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. पण या परिस्थितीतही पाकिस्तान सुधारलेला नाही. दहशतवादाला खतपाणी घालण्याचे त्यांचे उद्योग सुरुच आहेत. काश्मीरमधील १४ लाँच पॅडसवर मोठया संख्येने दहशतवादी थांबले आहेत. हे सर्व दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT