mirage-2000
mirage-2000 
देश

भारताच्या हल्ल्यात 300 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे बॉम्ब टाकल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी पहाटे साडे तीनच्या ही कारवाई करण्यात आली.  यामध्ये जवळजवळ 300 दहशतवादी ठार झाले आहेत. याबाबत भारताच्या सुरक्षा दलांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

तर पाकिस्तानी सैन्याने भारतीय विमानांनी घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. मात्र, यात पाकिस्तानच्या हद्दीत कोणतेही नुकसान झालेले नाही. पाकने भारताच्या विमानांना चोख प्रत्युत्तर दिले, असे पाकने म्हटले आहे.

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट होती. पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात होती. अखेर मंगळवारी भारताच्या हवाई दलाने पाकला सडेतोड उत्तर दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT