Uttarakhand
Uttarakhand  
देश

भारत-चीन सीमेजवळ हिमस्खलन; आठ जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळ झालेल्या हिमस्खलनात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळ झालेल्या हिमस्खलनात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचं गांभिर्य ओळखून भारतीय लष्कराने तात्काळ बचावकार्य सुरु केलं. आतापर्यंत ३८४ जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात लष्कराला यश आलं आहे. या सर्वांना लष्कराच्या कँपमध्ये ठेवण्यात आलं आहे. यामधील सहा ते 10 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर लष्काराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विटरवरून अलर्ट जारी केला होता.

शुक्रवारी, २३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास चमोली जिल्ह्यात जोरदार बर्फवृष्ठी झाली होती. जोशीमठ सेक्टरच्या सुमना क्षेत्रात भारत-चीन सीमेजवळही तुफान बर्फवृष्टी झाली. त्यामुळे ही दुर्घटना झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी घटनास्थळाचा हवाई दौरा केला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर रावत यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्यात.

चमोली जिल्ह्यात याआधीही असाच प्रकार घडला होता. फेब्रुवारीमध्ये चमोलीतील तपोवनमध्ये ग्लॅशियर तुटून ऋषिगंगा नदीत पडला होता. या दुर्घटनेत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT