Sushma Swaraj
Sushma Swaraj 
देश

नायजेरियात पाच भारतीय खलाशांचे अपहरण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताच्या पाच खलाशांचे नायजेरियातील चाच्यांनी अपहरण केले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली. शिवाय, नायजेरीयातील भारतीय उच्चायुक्तांना या खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

स्वराज यांनी ही बाब अत्यंत गंभीरतेने घेतली असून, नायजेरियातील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना तेथील सरकारमधील सर्वोच्च पदावरील व्यक्तींशी बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी नायजेरियातील भारतीय राजदूत अभय ठाकूर यांनाही अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'माध्यमांतील वृत्तातून मला याची माहिती समजली. त्यानंतर तत्काळ नायजेरीयातील भारतीय राजदूत अभय ठाकूर यांना याप्रकरणी लक्ष घालण्यास सांगण्यात आले आहे. नायजेरीयन सरकारशी चर्चा करुन या पाचही जणांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याच्या सुचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. शिवाय, या प्रकरणाचा अहवाल तयार करुन आपल्याकडे पाठवण्याचेही आदेश दिले आहेत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT