home minister amit shah  esakal
देश

Amit Shah: गरीब आदिवासींच्या धर्मांतरासाठी काँग्रेस सरकारी यंत्रणेचा वापर करते - अमित शाह

सकाळ डिजिटल टीम

Chattisgarh Election : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात छत्तीसगडमध्ये धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचा दावा करीत येथील गरीब आदिवासींच्या धर्मांतरासाठी काँग्रेस सरकारी यंत्रणेचा वापर आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केला.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी शहा यांची पंडारिया येथे आज प्रचारसभा झाली. त्यात काँग्रेसवर टीका करताना म्हणाले, ‘‘या पक्षाच्या सरकारमुळे छत्तीसगडमध्ये धर्मांतर वाढले आहे. राज्य घटनेने स्वतःच्या आवडीनुसार धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे. गरीब आदिवासींचे धर्मांतर करणे राज्याच्या हिताचे नाही. यामुळे छत्तीसगडमधील घराघरांत, गावागावांमध्ये संघर्ष सुरू आहे. कायदा-सुव्यवस्था खालावली आहे.’’

आमचे सरकार कोणाच्याही धार्मिक गोष्टींत हस्तक्षेप करणार नाही, मात्र कोणत्याही सरकारने धर्मांतराला प्रोत्साहन दिल्यास ते रोखण्यासाठी भाजपकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शहा यांनी दिला.

भूपेश बघेल हे काँग्रेसचे ‘प्रीपेड मुख्यमंत्री’ आहेत आणि जर ते पुन्हा सत्तेवर आले तर त्यांच्या पक्षाकडून (एटीएम कार्डप्रमाणे) त्यांचा वापर केला जाईल. यातून राज्यातील सर्व पैसा दिल्लीला नेला जाईल, असा आरोप करीत भूपेश बघेल हे लांगूनचालनाच्या राजकारणात गुंतले असून त्यांची उलट गणती सुरू झाली आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Pollution Crisis : नागपूरचा श्वास गुदमरतोय, संत्रानगरी धोक्याच्या उंबरठ्यावर; प्रदूषणाचा विळखा

Auqib Nabi: जम्मू-काश्मिरच्या गोलंदाजाने इतिहास रचला, रणजी स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी; गौतम गंभीर लक्ष आहे ना तुझं?

तोळ्यात नाही तर किलोत ! विजय-रश्मिकाच्या लग्नासाठी बनवले गेले एवढ्या वजनाचे सोन्याचे दागिने

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

Walmik Karad: मनोज जरांगेंचं भाकीत खरं ठरणार? वाल्मिकचा मुलगा धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलणार? फेसबुक पोस्टचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT