

Sanjay Ghadi
ESakal
मुंबई : मुंबईतील दिवसेंदिवस वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत आहेत. रस्त्यांवरील खड्डे, विविध प्रकल्पाची कामे किंवा अपघात अशा प्रकल्पामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत होत असल्याने मुंबईकरांचे हाल होतात. मुंबईतील वाहतूक कोंडीचे प्रकार उपमहापौर संजय घाडी यांना देखील सहन करावे लागत असल्यामुळे त्यांनी मुंबईतील शहर भागातच निवासस्थान मिळावे अशी मागणी केली आहे.