Indian soldier from Gorkha Rifles Rajib Thapa  
देश

पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार; जवान हुतात्मा

वृत्तसंस्था

श्रीनगर: पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरू असून, या गोळीबारात गोरखा रेजिमेंटचे जवान राजीब थापा हुतात्मा झाला आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (शुक्रवार) दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून पहाटेपासूनच गोळीबार सुरू होता. भारतीय लष्करही चोख प्रत्युत्तर देत होते. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असताना नौशेरा सेक्टरमधील कालसिया गावामध्ये तैनात असलेले जवान राजीब थापा हे जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना तत्काळ लष्करी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. पाकिस्तानकडून गेल्या चार दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.

दरम्यान, नौशेरा सेक्‍टरमधील कलाल परिसरात सोमवारी (ता. 19) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पाकिस्तानने गोळीबार करत तोफगोळ्यांचाही मारा केला होता. भारतीय लष्करानेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. या चकमकीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी शनिवारी पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारामध्ये भारताचे लान्सनाईक संदीप थापा हे हुतात्मा झाले होते. यानंतर भारतानेही पाकला सडेतोड उत्तर देत त्यांच्या काही चौक्‍या नष्ट केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT