Assam
Assam 
देश

आसाममधील संचारबंदी उठविली; ब्रॉडबॅन्ड सेवाही सुरु

वृत्तसंस्था

गुवाहाटी : नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून (कॅब) आसाममध्ये आगडोंब उसळल्यानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. आज (मंगळवार) सकाळी सहा वाजता संचारबंदी उठविण्यात आली असून, ब्रॉडबॅन्ड सेवाही सुरु करण्यात आली आहे.

आसाममध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर सरकारने राज्यातील इंटरनेट सेवा बंद केली होती. तसेच गुवाहाटीसह आसाममधील काही भागांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली होती. परंतू, आसाममधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने संचारबंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील ब्रॉडबॅन्ड इंटरनेट सेवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, मोबाईल इंटरनेवर मात्र बंदी कायम आहे.

केंदीय मंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर राज्यातून संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू झाल्यानंतर ईशान्येकडील राज्यांमध्ये हिंसाचार उफाळला होता. आसाममध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान शेकडो जणांना अटकही करण्यात आली आहे. आसाममधील शाळा आणि महाविद्यालये 22 डिसेंबरपर्यंत बंद आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशचा 'बुलडोझर पॅटर्न' सांगलीत.. योगी आदित्यनाथ यांच्या स्वागताला आणले जेसीबी

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Gold ETF: ‘ईटीएफ’ देतेय ‘सोन्या’सारखी संधी; गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामुळे चलती

SCROLL FOR NEXT