Assam 
देश

आसाममधील संचारबंदी उठविली; ब्रॉडबॅन्ड सेवाही सुरु

वृत्तसंस्था

गुवाहाटी : नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून (कॅब) आसाममध्ये आगडोंब उसळल्यानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. आज (मंगळवार) सकाळी सहा वाजता संचारबंदी उठविण्यात आली असून, ब्रॉडबॅन्ड सेवाही सुरु करण्यात आली आहे.

आसाममध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर सरकारने राज्यातील इंटरनेट सेवा बंद केली होती. तसेच गुवाहाटीसह आसाममधील काही भागांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली होती. परंतू, आसाममधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने संचारबंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील ब्रॉडबॅन्ड इंटरनेट सेवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, मोबाईल इंटरनेवर मात्र बंदी कायम आहे.

केंदीय मंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर राज्यातून संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू झाल्यानंतर ईशान्येकडील राज्यांमध्ये हिंसाचार उफाळला होता. आसाममध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान शेकडो जणांना अटकही करण्यात आली आहे. आसाममधील शाळा आणि महाविद्यालये 22 डिसेंबरपर्यंत बंद आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palava Flyover: सात वर्षे बांधकाम, ७२ कोटी खर्च... पण ७ महिनेही महत्वाचा उड्डाणपूल टिकला नाही, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Pali Crime : पालीत बनावट पोलिसांची दहशत; वृद्ध महिलेला फसवून पन्नास हजारांचे दागिने लंपास, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Updates : श्री पद्मनाभस्वामी आणि अट्टुकल मंदिरात बॉम्बस्फोटाची धमकी

Duleep Trophy Final: विदर्भाच्या यशचं द्विशतक फक्त ६ धावांनी हुकलं, पण रजत पाटिकरच्या संघाने सामन्यावर मिळवली मजबूत पकड

"एका व्हॅनमध्ये साहेब विवस्त्र बसलेले असतात आणि..." बॉलिवूड दिग्दर्शकाने केली कलाकारांची पोलखोल, म्हणाला

SCROLL FOR NEXT