Aviation sakal
देश

देशांतर्गत विमान उड्डाणे आता ८५ टक्के प्रवाशांसह

लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेली वाहतूक मे महिन्यात ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्यात आली होती.

सुधीर काकडे

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील हवाई वाहतूकीवर निर्बंध लावण्यात आले होते. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाने शनिवारी हवाई वाहतूकीसाठीची प्रवासी क्षमता ७२ टक्क्यांवरून वाढवून ८५ टक्के केली आहे. लॉकडाऊन दरम्यान देशांतर्गत उड्डाणांवर पूर्ण बंदी घातल्यानंतर २५ मे २०२० रोजी ३३ टक्के क्षमतेसह ऑपरेशन्स सुरू करण्यात आली होती.

प्रवाशांच्या मागणीनुसार अनुसूचित देशांतर्ग वाहतुकीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारत्या नागरी उड्डयन मंत्रालयाने २१ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार दिलेल्या अटी, १२ ऑगस्ट २०२१ रोजी शिथील करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिकृत अधिसुचना जाहीर करुन ७२.५ टक्के क्षमता वाढवून ती आता ८५ टक्के करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान देशांतर्गत उड्डाणांवर पूर्ण बंदी घातल्यानंतर २५ मे २०२० रोजी ३३ टक्के क्षमतेसह ऑपरेशन्स सुरू करण्यात आली होती. मंत्रालयाने विमान कंपन्यांना ३३ टक्के प्रवासी क्षमतेसह वाहतूक करण्याची परवानगी दिली होती. डिसेंबर २०२० पर्यंत हळूहळू ही मर्यादा ८० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली. १ जून, २०२१ रोजी पुन्हा एकदा संख्या ५० टक्क्यांवर आणण्यात आली, त्यानंतर ५ जूनला वाढवून ६५ टक्के करण्यात आली. १२ ऑगस्टला दिलेल्या शेवटच्या आदेशानुसार ७२.५ टक्के करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रवासी क्षमता ८५ टक्के करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT