देश

ग्राहकांनो, बँकेची कामे आताच उरकून घ्या कारण....

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : केंद्र सरकारच्या बँकांच्या विलिनीकरणाला बँक कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपावर जाण्याचा इशारा बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे. बँकांच्यां विलिनीकरणामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे या निर्णयाला बँक कर्मचारी विरोध करत आहेत.

कधी असणार कामकाज बंद?
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कंफेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, आणि नॅशन ऑर्गनायजेशन ऑफ बँक ऑफिस या बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी विलिनीकरणाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बँकांच्या विलिनीकरणामुळे अनेक कर्माचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. त्यामुळे या संघटनांनी संपाची हाक दिली आहे. केंद्र सरकारने दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २६ ते २७ अशा दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. त्यानंतर २८ सप्टेंबरला चौथ्या शनिवारची सुटी असणार आहे. तर २९ सप्टेंबरला रविवारची सुटी असणार आहे. त्यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. परिणामी ग्राहकांना आठवड्याच्या सुरुवातीलाच बँकांची कामे उरकून घ्यावी लागणार आहेत.

काय आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

  1. केंद्र सरकारच्या बँकांच्या विलिनीकरणाला विरोध
  2. दैनंदिन कामकाजात रोखीच्य व्यवहारांची वेळ कमी करावी
  3. पाच दिवसांचा आठवडा करणे
  4. ग्राहकांच्या सेवाकरामध्ये कपात करावी
  5. गारात वाढ करण्याची ही मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! पगार अन् पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ, पुढील आठवड्यात सरकार करणार घोषणा ?

Dharashiv News: २५% अटीत अडकली दहिफळची दारूबंदी चळवळ!; महिलांचा निर्धार ठाम.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

SCROLL FOR NEXT