देश

आता कंदिलाचे काम संपले; बिहारच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘राजद’ला टोला

उज्ज्वकुमार -सकाळ न्यूज नेटवर्क

गया (बिहार) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये पहिल्यांदाच रणशिंग फुंकत विरोधकांवर निशाणा साधला. राष्ट्रीय जनता दलाच्या पंधरा वर्षांच्या राजवटीत राज्यामध्ये गुन्हेगारी आणि लूटमारीचे प्रकार वाढले होते.  आता हीच मंडळी काश्‍मीरमध्ये ३७० वे कलम पुन्हा लागू करण्यात यावेत अशी मागणी करत असून त्यांची येथे मते मागण्याची हिंमतच कशी  होते,  असा सवाल मोदी यांनी केला. राज्यात आता वीज आली असून कंदिलाचे काम संपले आहे, असा टोलाही त्यांनी राजदला लगावला.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोदी म्हणाले, ‘‘ मागील तीन ते चार वर्षांपासून आपण जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्यासोबत काम करत आहोत. त्यांच्या कारकिर्दीमध्येच राज्यात विकासाची कामे वेगाने झाली. नितीशकुमार २०१७ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आले. गलवान खोऱ्यामध्ये चिनी सैनिकांविरोधात दोन हात करणारे देखील बिहारमधील जवानच होते.  काही मंडळी काश्‍मीरमध्ये पुन्हा ३७० वे कलम लागू करण्याची भाषा करत आहेत. अशी भाषा करणारी मंडळी आता बिहारमध्ये मते मागत आहेत. सीमेवर बलिदान देणाऱ्या येथील भूमिपुत्रांचा ही मंडळी अवमान करत आहेत.’ पंतप्रधान मोदी यांच्या आज बिहारमध्ये तीन ठिकाणी प्रचारसभा झाल्या. यामध्ये सासाराम, गया आणि भागलपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

लोकांनी यंदा सणासुदीच्या काळामध्ये खरेदी करताना स्थानिक मंडळींनी तयार केलेले साहित्यच खरेदी करावे. मातीपासून तयार करण्यात आलेल्या शिल्पाकृती, मातीची भांडी आणि पणत्या यांची खरेदी करण्यात यावी. आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर बिहार आणि भारत आत्मनिर्भर होईल. 
नरेंद्र मोदी, भागलपूर येथील सभेत 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोदी म्हणाले
विरोधक देश कमकुवत करत आहेत
विकासासाठी सक्रिय 
राज्यातील सरकार हे डबल इंजिनचे आहे
केंद्रातील काँग्रेसने राज्याचा विकास रोखला
केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी
विरोधक मध्यस्थांची भाषा बोलत आहेत
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT