file photo
file photo 
देश

पुरामुळे बिहारमध्ये 157 जण मृत्युमुखी; कोट्यवधींचे जनजीवन विस्कळित

पीटीआय

पाटणा: बिहारला पुराचा जोरदार फटका बसला असून, आतापर्यंत 157 जण मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील 17 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला असून, एक कोटी नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.

अरारिआ जिल्ह्यात 30 जण मरण पावले असून, पश्‍चिम चंपारण्यात 23, सीतामढी 13, मधुबनी 8 आणि कतिहारमध्ये 7 जण मरण पावले आहेत. पूर्व चंपारण्य जिल्ह्यातील किशनगंज आणि सुपुअल येथे प्रत्येकी 11 जण, तर पूर्णिया आणि मधेपुरामध्ये प्रत्येकी 9 जण मरण पावले आहेत. त्याशिवाय दरभंगा, गोपालगंज आणि सहरसा येथे प्रत्येकी चार जण, खगारिया, शेओहर येथे तीन आणि मुझफ्फरपूर येथे 1 जण मरण पावला आहे, अशी माहिती आपत्ती निवारण व्यवस्थापन विभागाचे विशेष सचिव अनिरुद्ध कुमार यांनी दिली. 17 जिल्ह्यांतील एक कोटी आठ लाख नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले असून, एक हजार 688 पंचायतींना या पुराचा फटका बसला आहे, असे ते म्हणाले.

गया, भागलपूर आणि पूर्णिया येथे उद्या (रविवारी) मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT