देश

'लोक कपडे खरेदी करतात म्हणजे देशात मंदी नाही'

पीटीआय

बलिया - देशात खरोखरच आर्थिक मंदी असती, तर आपण कपडेच खरेदी करू शकलो नसतो, असे सांगत भारतात आर्थिक मंदी नसल्याचा दावा भाजपचे खासदार वीरेंद्रसिंह मस्त यांनी केला आहे. 

बलियाचे खासदार वीरेंद्रसिंह एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, या कार्यक्रमाला आलेल्यांनी शर्ट आणि पँट घातली आहे. देशात आर्थिक मंदी असती, तर आपल्याला शर्ट-पँटऐवजी धोतर आणि कुर्ता घालून यावे लागले असते. जगाला आर्थिक मंदीचा विळखा बसलेला असू शकतो. मात्र, त्याचा भारतावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण, भारताची अर्थव्यवस्था मजबूत असून, ती मुख्यत्वे ग्रामीण आणि कृषीवर आधारित आहे. आर्थिक मंदी असती तर आपल्याला शर्ट, पायजमाही खरेदी करता आला नसता. 

भारत देश हा फक्त मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकता अशा महानगरांनीच बनलेला नाही; तर त्यात ६.५ लाख खेडी आणि गावे आहेत. बॅंकांमध्ये गावातील लोकांचाच पैसा अधिक आहे, असे बॅंकांच्या अहवालात म्हटले आहे. खेड्यातील लोकांनी त्याग, बलिदान दिले नसते तर भारताला मुघल आणि ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालेच नसते, असा दावाही वीरेंद्रसिंह यांनी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

SCROLL FOR NEXT