नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मंत्री सत्येंद्र जैन यांना लाच घेतल्याप्रकरणी लोकायुक्तांनी 'क्लीन चिट' दिली आहे. दिेल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रांनी केजरीवाल आणि जैन यांच्यावर दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता.
कपिल मिश्रांनी आरोप केला होता, की मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना दोन कोटी रुपयांची लाच दिली होती. तेव्हा ते समोरच होते असेही त्यांनी म्हटले होते. कपिल मिश्रांनी ही तक्रार लोकायुक्तांसमोर केली होती. लोकायुक्तांनी जेव्हा पुरावे मागितले तेव्हा त्यांनी पुरावे सीबीआयला दिल्याचे सांगितले होते. परंतु, सीबीआयने आपल्या अहवालात केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणून लोकायुक्तांनी हे प्रकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, लोकायुक्तांनी हा निर्णय दिल्यानंर नेटीझन्सनी या निर्णयाची दखल घेतली असून, #बेदाग_केजरीवाल हा ट्रेण्ड मोठ्या प्रमाणात ट्विटरवर ट्रेण्डिंगमध्ये आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.