central minister sarangi  
देश

केंद्रीय मंंत्रीच म्हणतात, 'वंदेमातरम् म्हणा, नाही तर देशाबाहेर व्हा'

सकाळ डिजिटल टीम

भुवनेश्वर : केंद्र सरकारने काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द केल्यानंतर त्याला काँग्रेसने विरोध केला. यावरून आता केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेसची ही भूमिका राष्ट्रविरोधी असल्याचे सांगत, जे वंदेमातरम स्वीकारत नाहीत. त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य सारंगी यांनी व्यक्त केले आहे. काश्मीर संदर्भात घेतलेला निर्णय कसा योग्य आहे, हे सांगण्यासाठी भाजपच्यावतीने देशभरात मोहीम राबवली जात आहे. त्यात ठिकठिकाणी जनजागरण सभा आयोजित करण्यात येत आहेत.

काय म्हणाले सारंगी?
भुवनेश्वर येथील जन जागरण सभेत केंद्रीय मंत्री सारंगी म्हणाले, ‘जेव्हा केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कट्टर विरोधी पक्षांनीही सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले. पण, काँग्रेसने त्याला आक्षेप घेतला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाक व्याप्त काश्मीर आणि सियाचीन हा भारतातच भाग असल्याचे काँग्रेसला, स्पष्ट केले आहे.’ बालासोर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सारंगी यांनी वंदेमारतम विषयीही परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘ज्यांना वंदेमातरम स्वीकारायचे नाही, त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही.’ सारंगी म्हणाले, ’७२ वर्षांनंतर केवळ मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने काश्मीरच्या जनतेला सर्वाधिकार दिले आहेत. काश्मीरमध्ये जमीन खरेदीचे व्यवहार सुरू झाले आहेत. आता काश्मीरच्या मुलींना काश्मीरबाहेरील मुलांशी विवाह करता येणार आहे. देशातील काही लोक सरकारने कलम ३७० संदर्भात घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं सिद्ध करण्याचा आटापिटा करत आहेत. जेव्हा कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाला संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळत असताना, ‘तुकडे-तुकडे गँग’ला सर्वांत मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याकडून काश्मीरमधील मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. पण, गेल्या अनेक वर्षांत काश्मीरमध्ये हजारो जवानांचा मृत्यू झाला. त्यावेळी मानवाधिकार दिसला नाही का?’

मंदींसाठी कोणाला धरले जबाबदार?
देशात नोटा बंदी आणि जीएसटीमुळे मंदी आल्याचे विधान मंत्री सारंगी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मोदी सरकारचे हे दोन्ही निर्णय महत्त्वाकांक्षी होते. पण, त्यावर केंद्रातीलच एखाद्या मंत्र्याने विरोधी वक्तव्य करणे आश्चर्यकारक होते. पण, सारंगी यांनी हे विधान करतानाच कोणाच्याही नोकऱ्या जाणार नाहीत आणि लवकरच अर्थव्यवस्थेचे चित्र बदलेल, असा विश्वास व्यक्त केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''सर्वात जास्त पुरावे तर माझ्याकडे, विरोधी पक्षातले कोण-कोण नेते...'' मुख्यमंत्र्यांचं खरात प्रकरणावर सर्वात मोठं विधान

Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलमधील मराठी भाषिक शहरावर हल्ला, १०० अधिक लोक जखमी झाल्याचा दावा

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भारत सरकार काळजी घेतंय, पाकिस्तान, बांगलादेशची अवस्था बघा : मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT