देश

काश्‍मीरमधील शाळांविषयी सरन्यायाधीशांना अश्रू अनावर

वृत्तसंस्था

जम्मू - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांना शनिवारी जम्मू-काश्‍मीरमधील शाळांच्या बिकट अवस्थेवर बोलताना अश्रू अनावर झाले. जम्मूमधील एका शाळेच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत होते. येथे सरकारला खूप आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. पण शिक्षण असे क्षेत्र आहे, की तेथे कोणताही समझोता करू शकत नाही. कारण हा विकासाचा एकमेव मार्ग आहे, असे ते या वेळी म्हणाले.

मला ठाऊक आहे की, दहशतवादामुळे 30 वर्षांपासून येथील परिस्थिती अतिशय वाईट आहे. येथील मुले शिकू नयेत, हेच त्या दहशतवादी शक्तींना हवे आहे. लोकांना दहशतवादाच्या दरीत ढकलण्यासाठी आता ते शाळाही पेटवून देत आहेत, असे सरन्यायाधीश ठाकूर म्हणाले. पण हे सर्व बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

जम्मूमध्ये अनेक मुले शाळेकडे पाठ फिरवत आहेत. काश्‍मीरमध्ये शाळा पेटवून दिल्या जात आहेत. त्यामुळेच शाळांकडे पाठ फिरवू लागले आहेत. पण मला अजूनही आशा आहे, असेही ते म्हणाले. हिज्बुलचा कमांडर बुऱ्हान वानी मारला गेल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात हिंसाचार उफाळून आला होता. संचारबंदीमुळे शालेय शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम झाला होता. अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. खोऱ्यात अनेक शाळा पेटवून दिल्या होत्या. आता मात्र, येथील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT