Closing Doors Of Opportunity For Common Man Says BJP MP Varun Gandhi
Closing Doors Of Opportunity For Common Man Says BJP MP Varun Gandhi 
देश

घराणेशाहीमुळे सामान्यांसाठी राजकारणाची दारे बंद होतायेत : वरूण गांधी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजकारणातील घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, राजकारणातील घराणेशाहीमुळे सामान्य नागरिकांसाठी राजकारणाचे दारे बंद होत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आणि निषेधार्ह आहे, असे टीकास्त्र वरूण गांधी यांनी राहुल गांधींवर सोडले. 

'फेडरेशन ऑफ कर्नाटक चेंबर्स ऑफ कॉमर्स'ने ‘भारताच्या भविष्याचा मार्ग, संधी आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानादरम्यान वरूण गांधी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''राजकारणातील घराणेशाहीमुळे सामान्य नागरिकांसाठी राजकारणाचे दरवाजे बंद होत चालले आहेत. आपण असे राजकारण केले पाहिजे. ज्यामुळे सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल. मात्र, प्रत्यक्षात घराणेशाहीला प्राधान्य देणारे राजकारण केले जाते आहे''. 

दरम्यान, राहुल गांधींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज (मंगळवार) विविध स्तरावरून शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र, त्यांचे बंधू वरूण गांधी यांनी राहुल गांधींवर आज टीकास्त्र सोडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT