Congress Forest Environment Minister Jairam Ramesh 
देश

काँग्रेसचे २००९ पासूनच चित्त्याकडे ‘चित्त’

तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांचा पत्राच्या संदर्भाने दावा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात चित्त्याच्या आगमनाचा उत्सव साजरा होत असताना त्याच्या श्रेयावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला केला आहे. भारतात चित्ता आणण्याच्या प्रकल्पाचा प्रारंभ २००९ मध्ये झाला होती असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस आणि तत्कालीन वन व पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केला आहे. या संदर्भात कधीच प्रयत्न झाले नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे म्हणणे त्यांच्या खोटे बोलण्याच्या सवयीचा भाग आहे असाही टोला त्यांनी लगावला.

नामीबियातून आणलेले तीन चित्ते शनिवारी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात मोदी यांच्या हस्ते सोडण्यात आले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मोदी यांनी मागील सरकारांवर शरसंधान केले होते. ‘सात दशकांपूर्वी देशातून लुप्त झालेल्या चित्त्यांना परत आणण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न झाले नव्हते,‘ अशी टिप्पणी त्यांनी केली होती.

त्यावर रमेश यांनी ''यूपीए‘ सरकारच्या काळात ‘प्रोजेक्ट चित्ता‘ राबविण्याबाबतचा पत्रव्यवहार ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आला. २००९ मध्ये भारतीय वन्य पशू ट्रस्टचे एम. के. रणजित सिंह यांना रमेश यांनी पत्र लिहिले होते. चित्त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत कृती योजना तयार करण्यासाठी आणि त्यासाठीचे संभाव्य ठिकाणी निश्चित करण्यासाच्या सूचना रमेश यांनी पत्राद्वारे दिल्या होत्या.

या पत्राचा हवाला देत रमेश यांनी म्हटले आहे की, हे ते पत्र आहे ज्याद्वारे २००९ मध्ये ‘प्रोजेक्ट चित्ता‘ सुरू करण्यात आला होता. आपले पंतप्रधान सवयीने खोटे बोलतात. मी भारत जोडो यात्रेच्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र असल्यामुळे शनिवारीच हे पत्र प्रसिद्ध करता आले नव्हते.

याआधीही चित्त्यांचे आगमन होण्याच्या बातम्या झळकल्यानंतर रमेश यांनी अशी योजना २००९ मध्ये झाल्याचा दावा ट्विटद्वारे केला होता. दरम्यान, रमेश यांच्या या दाव्यांवर भाजपकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Mumbai Local Megablock: गणेशोत्सवात मेगाब्लॉकचे विघ्न नाही, प्रवाशांना दिलासा; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

iPhoneचा भंडारा! Apple फोनचे मोफत वाटप, २२ सप्टेंबरला आयोजन; कुठे आणि कोण देणार? पाहा VIDEO

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

Chhatrapati Sambhajinagar Accident News: दुचाकीला कट लागल्याने रस्त्यावर कोसळला तरुण; मागून आलेल्या सिमेंट मिक्सरखाली आल्याने जागीच प्राण गमावले

SCROLL FOR NEXT