देश

Loksabha 2019: काँग्रेस उमेदवाराच्या निवडणूक प्रचारात बिर्याणीवरून गोंधळ; 9 जणांना अटक

वृत्तसंस्था

 मुझफ्फरनगर : बिजनौर मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार नसिमुद्दीन सिद्दिकी यांच्या समर्थकांत बिर्याणी खाण्यावरून झालेल्या धुमश्‍चक्रीत अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, परवानगी न घेता निवडणूक सभेत बिर्याणी तयार केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, 9 जणांना अटक करण्यात आली आहे. 

टडहेडा गावात शनिवारी माजी आमदार मौलाना जमील यांच्या निवासस्थानी निवडणूक सभा आयोजित केली होती. जमील यांनी अलीकडेच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. निवडणूक सभेनंतर दुपारी भोजनासाठी बिर्याणीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तेथे हजर असलेल्या कार्यकर्त्यांत बिर्याणी खाण्यावरून एकच गोंधळ उडाला. गोंधळ आवाक्‍याबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करावे लागले.

पोलिसांनी लाठीमार करून कार्यकर्त्यांना पांगविले. याप्रकरणी जमील आणि त्यांचा मुलगा नईम अहमदसह 34 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर गावात सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT