corona relief , it employees, government extends work from  
देश

कोविड 19 : IT कंपनीत काम करणाऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

सुशांत जाधव

नवी दिल्ली : कोरोना विषाणू  (Coronavirus) च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने IT आणि BPO क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. देशातील कोरोना विषाणूचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन  सरकारने को वर्क फ्रॉम होमचा कालावधी वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने जाहीर केलेल्या नव्या आदेशानुसार, आयटी आणि बीपीओ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत म्हणजेच वर्षाखेरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी  वर्क फ्रॉम होमचा कालावधी 31 जुलैला समाप्त होणार होता. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्यामुळे आयटी आणि बीपीओ क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चिंता वाढवली होती. मात्र केंद्र सरकारने घरातून काम करण्याची मुदत वाढवून या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. 

मोठी बातमी : भारतीयांना कोरोना लस मिळणार मोफत

केद्रीय दूरसंचार विभाग (डीओटी) ने रात्री मंगळवारी रात्री उशीराने यासंदर्भातील माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘‘कोविड-19 च्या वाढत्या चिंताग्रस्त परिस्थितीत घरातून काम करण्यासाठी दिली जाणारी सवलत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत वर्क फ्रॉम होमची मुदत वाढवण्यात आली आहे. सध्याच्या घडीला जवळपास 85 टक्के कर्मचारी घरातून काम करतात. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचारीच कार्यालयात जाऊन काम करत आहेत. मंगळवारच्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा  11.55 लाखावर पोहचला आहे. आतापर्यंत 28,084 लोकांनी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा गोंधळ

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT