corona update sakal Media
देश

Covid-19 Death rate : भारतीयांच्या आहाराच्या सवयींमुळेच देशातला कोरोना मृत्यूदर कमी; अभ्यासातून आलं समोर

महामारीच्या काळात, लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या देशांमध्ये संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असते.

वैष्णवी कारंजकर

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की भारतातील कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान कमी मृत्यू झाल्याचं कारण म्हणजे भारतीयांचा आहार आहे.

१३ एप्रिल रोजी प्रथम प्रकाशित झालेल्या या संशोधनात ब्राझील, जॉर्डन, स्वित्झर्लंड, सौदी अरेबिया आणि भारतातील शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाचा समावेश होता. अभ्यासाचे लेखक, डॉ. देबमाल्य बारह आणि प्रोफेसर निर्मल कुमार गांगुली, जे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी महासंचालक देखील होते. त्यांनी उघड केलं आहे की लसीकरण आणि इतर उपायांव्यतिरिक्त, भारतीय अन्न सवयी आणि अन्न घटकांनी कदाचित एक भूमिका बजावली आहे. भारतीयांमध्ये कोविड-१९ मुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याची तीव्रता आणि शक्यता कमी करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे.

संशोधकांच्या मते, महामारीच्या काळात, लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या देशांमध्ये संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असते. प्रति 100,000 लोकांमागे (1/100,000) मृत्यू दर तपासताना असं आढळून आलं की, प्रति चौरस किलोमीटर 428 लोकसंख्येची घनता असलेल्या भारताचा मृत्यू दर पाश्चात्य देशांच्या तुलनेत 5 ते 8 पट कमी आहे. संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात हा निष्कर्ष काढला आहे.

अभ्यासासाठी, संशोधकांनी दोन गट केले - कमी मृत्यू दर (39-40 मृत्यू/100,000) देश आणि उच्च मृत्यू दर (225-300 मृत्यू/100,000) देश. भारत पहिल्या गटात होता, तर अमेरिका, ग्रीस आणि स्पेन हे देश नंतरच्या गटात होते. त्यानंतर संशोधकांनी संबंधित देशांच्या राष्ट्रीय स्तरावर या दोन गटांमधील प्रमुख पदार्थ/मसाले/पोषक घटकांचा दरडोई रोजचा वापर ओळखला. भाजीपाला, संपूर्ण धान्य, शेंगा, लाल मांस, दुग्धजन्य पदार्थ, मासे, अल्कोहोल, कॉफी, फळे, नट, चहा आणि हळद यासारखे बारा पदार्थ/मसाले/पोषक घटक हे गटांमधील महत्त्वाचे बदल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT