covid 19
covid 19 
देश

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 30 लाखांच्या वर; संसर्गाचा वेग वाढला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून शनिवारी रुग्णांची संख्या 30 लाखांच्या वर पोहोचली. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडवारीनुसार देशात 29 लाख 75 हजार 701 रुग्ण होते. सांयकाळपर्यंत हा आकडा 30 लाखांवर पोहोचला. शुक्रवारी सकाळी 8 ते शनिवारी सकाळी 8 या 24 तासात देशात कोरोनाचे 69 हजार 878 रुग्ण आढळले होते. एका दिवसात सापडलेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. भारतासह जगभरातील 180 देशांना कोरोनाचा विळखा पडला आहे. आतापर्यंत 2.26 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली असून जवळपास 8 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाच्या संसर्गाचा वेग वाढला असला तरी सुदैवाने रुग्ण बरं होण्याचं प्रमाण भारतात जास्त आहे. आतापर्यंत एकूण 22 लाख 22 हजार 577 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहे. तर कोरोनामुळे भारतात मृत्यू झालेल्यांची संख्या 55 हजार 794 इतकी आहे. भारतातील रिकव्हरी रेट 74.69 टक्क्यांवर पोहचला असून पॉझिटिव्हिटी रेट 6.82 टक्के इतका आहे.

एका दिवसात विक्रमी चाचण्या
भारतात 21 ऑगस्टला 10 लाख 23 हजार 836 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात झालेल्या चाचण्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. आतापर्यंत एकूण 3 कोटी 44 लाख 91 हजार 73 जणांची कोरोना चाचणी कऱण्यात आली आहे. 

निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
देशातील जवळपास सर्वच राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र प्रवासाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर बाहेरच्या प्रदेशातून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याचे प्रकारही घडले आहेत. केरळमध्ये सुरुवातीला आटोक्यात असणारा कोरोना आता सामूहिक संसर्गापर्यंत पोहचला असल्याचं तिथल्या राज्यसरकारने म्हटलं आहे.

दोन वर्षांत संपेल कोरोना - WHO
कोरोना महामारी स्पॅनिश फ्लूपेक्षा कमी वेळात नष्ट होऊन जाईल. कोरोना महामारी दोन वर्षांपेक्षा कमी काळात संपण्याची आशा आहे, असं WHO ने म्हटलं आहे. 1918 मध्ये युरोपात स्पॅनिश फ्लू पसरला होता. त्यावेळी जवळजवळ तीन वर्ष या महामारीची साथ युरोपात होती. याकाळात अनेकांना आपला जीव गमवाला लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT