Jammu-Kashmir 
देश

जम्मू-काश्‍मीर हळूहळू येतेय पूर्वपदावर; संचारबंदी शिथिल

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमधील पाच जिल्ह्यांतील प्रतिबंधात्मक आदेश केंद्राने शनिवारी (ता.10) उठविल्यानंतर येथील जनजीवन पूर्ववत झाले असून, डोडा आणि किश्‍तवाड या जिल्ह्यांतील संचारबंदीही मागे घेण्यात आली आहे.

जम्मूतील पाचही जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली असून, सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही वाढली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

जम्मू, कथुआ, सांबा, उधमपूर आणि रियासी या पाचही जिल्ह्यांतील सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक आदेश मागे घेण्यात आले आहेत. काश्‍मीर खोरे हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले असून, पाच ऑगस्टपासून येथे एकही अनुचित घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या भागातील शुक्रवारची प्रार्थना शांततेत पार पडल्यानंतर आज व्यापार संकुले आणि दुकाने सुरू झाली होती. पूँछ, राजौरी आणि रामबन या जिल्ह्यांतील संचारबंदी मात्र कायम आहे. 

येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये जम्मू- काश्‍मीरमधील परिस्थिती निवळेल, सध्या पाकिस्तानातील नेतेमंडळी चिथावणीखोर आणि बेजबाबदार विधाने करत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सरकारने योग्य पावले उचलली आहेत. 
- जी. किशन रेड्डी, केंद्रीय गृहराज्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: आमचे ऑपरेशन 3.0 सुरू... आता महाभुकंप होणार ; संजय शिरसाटांचा मोठा दावा

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

Raj Thackeray Letter : बाळासाहेब, पवार साहेब, महाजन यांनी कोणालाच पाठीशी घातल नाही; राज ठाकरेंची फडणवीसांवर 'सत्तेचा माज, मौनावर' कठोर शब्दांत टीका

SCROLL FOR NEXT