Rahul Gandhi
Rahul Gandhi 
देश

नोटाबंदी हा ‘दहशतवादी हल्ला’ - राहुल गांधी

पीटीआय

नवी दिल्ली - केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. ‘तीन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त होऊन लाखो लोकांचे रोजगार गेले, छोट्या व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले,’ असे राहुल यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 

‘डिमॉनेटायझेशन डिझास्टर’ या नावाचा हॅशटॅग वापरत राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला आहे. या जीवघेण्या हल्ल्याच्या सूत्रधारांना शासन झाले नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नोटाबंदीवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘मोदी हे सध्याच्या काळातील तुघलक’, असे त्यांनी म्हटले आहे. नोटाबंदी हा केंद्र सरकारला चांगला निर्णय वाटत असेल तर आज या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असताना नेते याबाबत शांत का आहेत?, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT