२००८ मधील बाटला हाऊस एन्काउंटरप्रकरणी दहशतवादी अरिझ खान याला दिल्लीच्या साकेत कोर्टानं दोषी ठरवलं आहे. दुर्मिळ प्रकरणातील दुर्मिळ प्रकरण असल्याचं माणत कोर्टानं अरिझला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच ११ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. कोर्टानं यामधील १० लाख रुपयांची रकम शहीद पोलिस आधिकारी मोहनचंद्र शर्मा यांच्या कुटुंबियांना देण्याचा आदेशही यावेळी दिला.
कोर्टाने आर्म्स अॅक्ट आणि भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३०७ अंतर्गत अरिझ खानला दोषी ठरवलं आहे. २००८ मध्ये दिल्लीत झालेल्या बाटला हाऊस एन्काऊंटरनंतर अरिझ खान हा फरार झाला होता. त्यानतंर फेब्रुवारी २०१८ मध्ये दिल्ली पोलिसांनी त्याला नेपाळमधून अटक केली होती.
बाटला हाऊस इन्काऊंटरमध्ये जीव गमावलेल्या इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा यांच्या हत्येसाठी अरिझला दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच पोलीस कर्मचारी बलवंत सिंह-राजवीर यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न त्याने केला होता. कोर्टाने अरिझला दोषी ठरवलं.
कोण आहे अरिझ खान?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.