देश

काेयना, अलमट्टीतून पाणी सोडण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून चार टीएमसी कृष्णेत पाणी सोडा, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यासाठी अलमट्टी जलाशयातून चार टीएमसी पाणी सोडा असा ठराव जिल्हा पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत करण्यात आला.

जिल्हा पंचायतीची सर्वसाधारण बैठक आज झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष अरुण कटांबळे होते. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. व्ही. राजेंद्र उपस्थित होते.

अथणी तालुक्यातील जिल्हा पंचायतीच्या सदस्यांनी पाणी टंचाईचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. बेळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने कृष्णा नदीकाठच्या गावांना पाणी टंचाई निर्माण झाली आहे.  या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महाराष्ट्रालाही पाण्याची गरज आहे तशी त्यांची मागणीही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून चार टीएमसी कृष्णेत पाणी सोडावेत, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यासाठी अलमट्टी जलाशयातून 4 टीएमसी पाणी सोडावे असा  ठराव जिल्हा पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत एकमताने पास करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: MPही सूरतची पुनरावृत्ती? शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश..काँग्रेसची कोंडी

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

SCROLL FOR NEXT