देश

Loksabha 2019 : साध्वी प्रज्ञासिंहांच्या विधानांमुळे भाजपची दिल्लीत पंचाईत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने दिल्लीत भाजपची स्थिती अवघडल्यासारखी झाली. "भाजप सर्व हुतात्म्यांचा सन्मान करतो,' अशा गुळमुळीत शब्दांत प्रतिक्रिया देणाऱ्या भाजपवर आपल्याच लोकसभा उमेदवाराच्या निंदनीय वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगण्याची वेळ आली. 

भोपाळमधून भाजपने उमेदवारी दिलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यामुळे दिल्लीत भाजपची विचित्र अवस्था झाली. कॉंग्रेसने या मुद्द्याचा वापर करून निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावल्याने आयोग काय कारवाई करणार, याकडे आता लक्ष लागले आहे. बॉंबस्फोट खटल्यातील एका आरोपीला संघाच्या दबावातून तिकीट द्यावे लागल्याचे सांगितले जाते.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भोपाळमध्ये बोलताना हुतात्मा करकरे यांच्याबद्दल अपशब्दांचा वर्षाव केला व त्यावरील प्रश्‍नांच्या फैरींना तोंड देणे दिल्लीतील भाजपचे सारे नेते-प्रवक्ते टाळत असल्याचे दिसले. अखेर पत्रकारांच्या फैरींना तोंड देण्यासाठी भाजपने शहानवाज हुसेन यांना पुढे केले. हुसेन यांनी प्रज्ञासिंह यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नसल्याचे सूचकपणे सांगितले. ते म्हणाले, की देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सर्वांनाच आम्ही हुतात्मा मानतो. आम्ही त्यांच्या सर्वोच्च त्यागावर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

करपलेलं सोयाबीन... चाऱ्यासाठी काढणी! शेतात महिलांची धडपड!

SCROLL FOR NEXT