BJP
BJP 
देश

Loksabha 2019 : '23 मे रोजी केंद्रासह गुजरात सरकारही पडणार'

वृत्तसंस्था

अहमदाबाद : यंदाच्या लोकसभेचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार असून, या निकालानंतर देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार राहणार नाही. तसेच गुजरातमध्येही भाजपचे सरकार पडेल, असा दावा गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे.

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झालेल्या शंकरसिंह वाघेला यांनी गुजरातमधील 40 आमदार संपर्कात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी 23 मे नंतर देशात एनडीए सरकार नसेल, असेही म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, राजकीय तर्कवितर्क सुरु झाले आहेत.

वाघेला म्हणाले, की भाजपचे 40 आमदार माझ्या संपर्कात आहेत. राज्यातील नेतृत्व यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करत आहेत. 

गोध्राप्रमाणे पुलवामा हल्लाही भाजपचे षडयंत्र
भाजप निवडणूक जिंकण्यासाठी दहशतवादाचा आधार घेत आहे. गोध्रा हत्याकांडप्रमाणे भाजपने पुलवामा हल्ला घडविला असे म्हटले आहे. पुलवामा हल्ला ज्या गाडीने घडविण्यात आला, त्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर गुजरातमधील होता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT