Hearing on Tamil Nadu-Karnataka kaveri water allocation petition adjourned till 21september sc  esakal
देश

Kaveri River : तमिळनाडू-कर्नाटक कावेरी पाणी वाटप याचिकेवरील सुनावणी २१ पर्यंत पुढे ढकलली

याचिकेवर आज सुनावणी घेणारे न्यायाधीश भूषण गवई हे रजेवर आहेत

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : कावेरी नदी पाणीवाटप वादाबाबत तमिळनाडूने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २१ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. कावेरीतून पुरेसे पाणी कर्नाटक सोडत नसल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या तमिळनाडू सरकारने आणखी पाणी सोडण्याचे आदेश द्यावे, अशा आशयाचा अर्ज दाखल केला आहे.

या याचिकेवर आज सुनावणी घेणारे न्यायाधीश भूषण गवई हे रजेवर आहेत. आपण पुढील आठवड्यात सुनावणीसाठी उपलब्ध नाही, असे स्पष्ट करून तमिळनाडूचे वकील मुकुल रोहतगी यांना सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर जाऊन नवीन खंडपीठाची विनंती केली. रोहतगी यांनी न्यायाधीश भूषण गवई यांना त्यांच्याच खंडपीठात खटला सुरू ठेवण्याची विनंती केली.

नंतर, न्यायाधीश गवई यांनी २१ सप्टेंबरला सुनावणी देण्याचे मान्य केले. कर्नाटक रयत संघटनेने दाखल केलेल्या याचिकेचीही सुनावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने कर्नाटकाला पुढील पंधरवड्यापर्यंत दररोज ५,००० क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. तमिळनाडूने यावर आक्षेप घेतला.

मात्र यावर कर्नाटकने म्हटले, कावेरी खोऱ्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. ‘केआरएस’ धरणातही पाणी नाही. त्यामुळे मागणीनुसार पाणी सोडणे कठीण असल्याचे नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT