Manoharlal Khattar
Manoharlal Khattar 
देश

भाजपला बसू शकतो धक्का; नव्या एक्झिट पोलमध्ये संकेत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियानात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सर्वच प्रमुख वाहिन्यांनी एक्झिट पोलचे अंदाज वर्तविले आहेत. पण, हरियानातील निकालाबाबत आज तकने यापूर्वी वर्तविलेला अंदाज बदलून आता भाजपला एकहाती सत्ता मिळेल हे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र आणि हरियानात पुन्हा भाजपाचेच सरकार येणार असल्याचे म्हटले होते. मात्र, हरियाणामध्ये मतदानानंतर केलेल्या एका सर्व्हेमध्ये भाजपाला धक्का बसण्याचे संकेत आहेत. आज तक आणि ऍक्सिस माय इंडिया यांनी केलेल्या या सर्व्हेमध्ये भाजपाल बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. सत्ताधारी भाजपला 32 ते 44 जागा मिळू शकतात. ही संख्या बहुमतापेक्षा खूपच कमी आहे. या सर्व्हेनुसार काँग्रेसला 30 ते 42 जागा मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तर जेजेपीला 6 ते 10 आणि इतरांना 6 ते 10 जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे. जेजेपीमुळे भाजप सत्तेपासून दूर राहिल असा अंदाज आहे.

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला 47 जागा मिळाल्या होत्या. बहुमत मिळाल्याने सरकार बनविले होते. विभाजनाचे इनेलोला मोठे नुकसान होऊ शकते. 2014 मध्ये इनेलोला 19 जागा मिळाल्या होत्या. सोमवारी दाखविलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 75 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. आता हरियानामध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही. यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते. हरियानात एकूण 90 जागांवर मतदान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT