Indian Railway
Indian Railway esakal
देश

Indian Railway : एका दिवसासाठी रेल्वे बंद झाली तर...

सकाळ डिजिटल टीम

Indian Railway : झुक झुक करत रेल्वेरूळावर मामाच्या गावी जाणारी रेल्वेगाडी अशी पूर्वी लहान मुलांना रेल्वेची ओळख करून दिली जायची. ते गाणं आजही आठवलं की नक्कीच तुमच्या जुन्या आठवणी जाग्या होतील. आजच्या दिवशी म्हणजेच १६ एप्रिल १८५३ मधे भारतात पहिली प्रवासी रेल्वे सेवा बोरीबंदर ते ठाणे येथून सुरू झाली होती. आज भारताने बरीच प्रगती केलीय. विमानसेवा, कॅब यांसारख्या सोईसुविधांनी भारत सज्ज असला तरी सर्वसामान्यांसाठी मात्र रेल्वे आजही तेवढीच महत्वाची.

बाहेरगावी शिक्षण घेणारे विद्यार्थी असो किंवा नोकरीच्या निमित्ताने शेकडो किमी अतंरावरून मोठ्या शहरांत आलेली तरुण पिढी असो प्रत्येकासाठी रेल्वेचा प्रवास सोयीस्कर ठरतो. मुंबईकरांचा विचार केला तर त्यांंना लोकलशिवाय त्यांच्या आयुष्याची कल्पना करणेसुद्धा शक्य नाही. अशात रेल्वे एक दिवसासाठी बंद झाली तर कसे होईल.

Indian Railway

रेल्वे बंद झाली तर...

एका दिवसासाठी का होईना पण रेल्वे बंद झाली तर जणू दिवस थांबल्यासारखा वाटेल. सगळ्यांची कामं विस्कळेल. तुम्हाला असं वाटत असेल की रेल्वे एका दिवसासाठी बंद झाली तर याचा त्रास फक्त प्रवाशांनाच होईल. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की रेल्वेने बऱ्याच गोष्टी आयात आणि निर्यातसुद्धा होतात. त्यामुळे रेल्वे बंद झाली तर त्याचा आर्थिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. वेळीच रेल्वेने वस्तू निर्यात न झाल्याने त्यांच्या किमती वाढतील तर दुसरीकडे ज्यांना रेल्वेशिवाय पर्याय नाही अशांची कामे पूर्णपणे ठप्प पडतील.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे कठीण होऊन बसेल

रेल्वेसेवा ही अत्यंत सोयीस्कर आणि सुखकर आहे. ज्यांच्या गावी जाण्यासाठी जलद मार्ग हा रेल्वे ठरू शकतो. अशांना कितीतरी वाहनं बदलून जाणे फारच त्रासदायक वाटेल. तसेच या सगळ्यांत वेळही फार वाया जाईल. (India)

पैशांचा प्रश्न

रेल्वे ही दोन शहरांना जोडण्याचे काम करते. रेल्वेची तिकीटही सर्वसामान्यांना परवडणारी असते. मात्र रेल्वे बंद झाली तर तुम्हाला वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास करावा लागेल आणि त्यात पैसेही फार जातील.

रेल्वे ही केवळ माणसांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम करत नाही तर संस्कृती जपण्यातसुद्धा रेल्वेचा मोलाचा वाटा आहे. रेल्वेप्रवासादरम्यान वेगवेगळ्या प्रांताचे, संस्कतीचे लोक यांच्याशी तुमचा जवळचा संपर्क येतो.

Indian Railway

रेल्वे सेवा बंद झाल्यामुळे रस्त्यावर इतर वाहनांची गर्दी वाढेल त्यातून अपघातासारखे घातक परिणाम होण्याची शक्यता अधिक वाढेल. एवढेच नव्हे तर वाहनांची संख्या वाढल्याने आपल्या पर्यावरणामध्ये प्रदूषणाचे प्रमाण देखील अधिक वाढेल. तसेच रेल्वे सेवा बंद झाल्याने आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अधिक वेळ लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT