Indian women forcefully arrested
Indian women forcefully arrested 
देश

भारतीय पत्नीला जबरदस्ती घेतले ताब्यात

पीटीआय

इस्लामाबाद - व्हिसा अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी आपल्या पत्नीला जबरदस्ती ताब्यात घेतल्याचा आरोप पाकिस्तानी नागरिकाने केला आहे. याबाबत त्याने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.

नवी दिल्लीतील उझमा व ताहीर यांची मलेशियात भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी विवाह करण्याचा निर्णयही घेतला. त्यानंतर उझमा 1 मे रोजी भारतातून पाकिस्तानमध्ये गेली आणि तेथे 3 मे रोजी त्यांचा विवाह संपन्न झाला होता. ताहीर आपल्या व्हिसासाठी पत्नीसह येथील उच्च आयोगाच्या कार्यालयात गेला होता. तेथे त्याने त्याबाबतचा अर्ज सादर केला.

दरम्यान, तेथील अधिकाऱ्यांनी त्याच्यांकडील मोबाईल फोन काढून घेतले होते. नंतर अधिकाऱ्यांनी उझमा हिला आत बोलावून घेतले; मात्र काही तास लोटले तरी, ती बाहेर न आल्याने ताहीरने याची चौकशी केली. तेव्हा उझमा येथे नसल्याचे त्याला सांगण्यात आले. काढून घेतलेले फोन परत करण्यासही अधिकाऱ्यांनी नकार दिला, असे ताहीरने म्हटले आहे.

आरोप फेटाळले
ताहीरला आपण त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी कार्यालयात बोलावले असून, त्याला त्याचा व्हिसाही प्रदान करण्यात येणार आहे, असे उच्च आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. उझमा तिच्या इच्छेनुसार तेथे राहत असल्याचा दावाही आयोगाने केल्याचे जिओ न्यूजने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT