देश

गडकरींना अडचणीत आणाल तर...

सरकारनामा ब्युरो

नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात खोटे व ईडीच्या माध्यमातून त्रास दिला गेल्यास भाजपला अडचणीचे होईल, असा इशारा राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे देण्याच्या वाढत्या मागणीनंतर आता भाजपमधून वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा विरोध सुरू झाला आहे. भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी किशोर तिवारी यांच्यावर टीका केली आहे. यानंतर पुन्हा किशोर तिवारी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून आपली भूमिका मांडली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रचंड नाराजी पसरली आहे. समाजाच्या सर्व वर्गामध्ये विश्‍वासाचे नाते निर्माण करण्यासाठी मवाळ व ग्रामीण अर्थव्यवस्थेची जाणकर असलेल्या नेत्यांची आवश्‍यकता असल्याने भाजपचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याकडे तिवारी यांनी केली आहे.

या मागणीनंतर माझ्यावर टीकेची झोड उठविली जात असल्याचा आरोप करून तिवारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, यात देशातील 'मोदी-शहा भक्तां'चा समावेश आहे. आपण भाजपचे सदस्य नाही. गडकरींना नेतृत्व सोपवावे, हे आपले व्यक्तिगत मत आहे. विदर्भात गेल्या 25 वर्षांपासून शेतकरी व आदिवासी क्षेत्रात काम करीत आहे. पक्षात मवाळ नेतृत्व आल्यास देशातील अल्पसंख्याक समाज पुन्हा भाजपकडे येईल. या आपल्या खुल्या चर्चेला काही जणांनी विकृत रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आपण व्यथित झालो आहे. मोदी-शहा भक्तांनी आपला अपमान करू नये, असा सल्ला तिवारी यांनी दिला आहे.

या पत्रामुळे नितीन गडकरीच 'अडचणी'त येतील, त्यांच्यावर 2012 सारखे खोटे आरोप व ईडीचा त्रास सुरू होईल, अशी भीती काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. असा प्रकार झाल्यास भाजपच्या अडचणीत वाढ होईल, असा इशारा तिवारी यांनी दिला आहे. परंतु माझ्या पत्रानंतर काश्‍मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या भूमिकेचे समर्थन केले आहे. यामुळे पक्षाला गडकरींचा नेतृत्व मान्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT