Land finally acquired after 108 years Judge Shweta Singh favor of Darbar Singh son-in-law Atul Singh Sakal Digital
देश

अखेर १०८ वर्षांनंतर मिळाला जमिनीचा ताबा

तीन एकर जमीनीवर मालकी सांगत १९१४ मध्ये दरबारी सिंह यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : जमीनीच्या एका हिश्‍श्‍यासाठी बिहारमधील एका व्यक्तीने न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याचा १०८ वर्षांनंतर निकाल लागला आहे. यामुळे भोजपूर हे गाव सध्या चर्चेत आले आहे. तीन एकर जमीनीवर मालकी सांगत १९१४ मध्ये दरबारी सिंह यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यांनी नथुनी खान नावाच्या व्यक्तीकडून या जमिनीची खरेदी केली होती.

नथुनी यांचा १९११ ला मृत्यू झाल्यावर त्यांच्या वारसांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण झाले. या कुटुंबाच्या मालकीच्या असलेल्या नऊ एकर जागेपैकीच तीन एकर जागा दरबारी सिंह यांनी खरेदी केली होती. मात्र, त्यांची जमीनही अडकली. त्यावरून हे प्रकरण न्यायालयात गेले होते. विशेष म्हणजे फाळणीनंतर नथुनी यांचे सर्व वारसदार पाकिस्तानात निघून गेले होते. त्यानंतर ही जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात गेली. त्यानंतरही दरबारी यांच्या चार पिढ्या न्यायालयात लढत होत्या. अखेर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्‍वेता सिंह यांनी दरबारी सिंह यांचे पणतू अतुल सिंह यांच्या बाजूने निकाल दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवाजी पार्कसाठी ठाकरे बंधू अन् भाजप-शिंदेसेनेचाही अर्ज, एकच तारखा; कुणाला मिळणार परवानगी?

Crime News: काकाच्या हत्येचा बदला? नमाजानंतर चाकूहल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल ठार, जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

भाविकांसाठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस राहणार बंद; मूर्तीवर लवकरच हाेणार रासायनिक प्रक्रिया..

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT