देश

अर्धकुंभमेळ्यापूर्वी गंगेतील प्रदूषण रोखणार: आदित्यनाथ

वृत्तसंस्था

लखनौ : अलाहाबादला 2019 मध्ये होणाऱ्या अर्धकुंभमेळ्यापूर्वी गंगेमध्ये पडणारा कचरा आणि दूषित पाणी रोखण्याच्या दृष्टीने मोठा कृती आराखडा आखल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सांगितले.

इशा फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये आदित्यनाथ यांनी गंगा शुद्धीकरणाबाबत सुरू असलेल्या कामाची माहिती सांगितली. "प्रयागला (अलाहाबाद) दोन वर्षांनंतर होणाऱ्या अर्धकुंभमेळ्यापूर्वी एकही नाला अथवा कचरा गंगेच्या पाण्यात पडणार नाही. यासाठी मोठा कृती आराखडा आखण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "नमामि गंगे' प्रकल्पाअंतर्गत तीस हजार कोटी रुपयांचे काम सुरू झाले असून, याअंतर्गत गंगा आणि तिच्या उपनद्या कायम प्रवाही आणि स्वच्छ करणार आहे,' असे आदित्यनाथ म्हणाले. या दोन वर्षांमध्ये कोणालाही गंगेमध्ये घाण टाकू दिली जाणार नाही.

ठिकठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून दूषित पाणी शुद्ध करूनच नदीत सोडले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात नदीकिनारी असलेली सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशही आल्याचे आदित्यनाथ यांनी आवर्जून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT