देश

गोरखपूरमधील मृत्यूचे तांडव: राज्य सरकारला प्रतीक्षा अहवालाची

वृत्तसंस्था

लखनौ : गोरखपूरमधील बाबा राघवदास रुग्णालयातील ऑक्‍सिजनची कमतरता हा गंभीर गुन्हा असून याप्रकरणी राज्य सरकार कोणालाही माफ करणार नाही. आम्ही सध्या तपास अहवालाची प्रतीक्षा करत असून, तो प्राप्त झाल्यावर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथसिंह यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

रुग्णालयातील ऑक्‍सिजनचा पुरवठा जेव्हा पूर्णपणे बंद करण्यात आला होता, त्या दरम्यान एकाही बालकाचा मृत्यू झाला नव्हता. मुख्य सचिव राजीवकुमार यांच्या नेतृत्वाखालील समिती या घटनेचा तपास करत असून, ती लवकरच आपला अहवाल सरकारदरबारी सादर करेल, असेही त्यांनी नमूद केले.

नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालावरून राज्यातील मेंदूज्वराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे आढळून आले आहे, ही एक चांगली बातमी आहे. मेंदूज्वराच्या समूळ उच्चाटनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी राज्यभर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. गोरखपूरमधील रुग्णालयास केल्या जाणाऱ्या ऑक्‍सिजनच्या पुरवठ्याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, की दिल्लीतील तीन सदस्यांची एक टीम याचा तपास करते आहे. ऑक्‍सिजनपुरवठा करणाऱ्या कंपनीचे बिल थकले होते का? याबाबत वितरक, पुरवठादार आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनामध्ये नेमका कोणता करार झाला होता, या सर्व बाबी सध्या चौकशीच्या कक्षेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : तिलक वर्माचे अर्धशतक! टीम डेविडचीही फटकेबाजी; मुंबई मिळवणार विक्रमी विजय?

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT