Rahul Gandhi
Rahul Gandhi sakal
देश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची 'ही' याचिका हायकोर्टाने फेटाळली

सुनिता महामुनकर

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या हत्येबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी केलेले भाषण पुरावा (evidence) म्हणून दाखल करण्याची मागणी करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याची याचिका (Petition) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) फेटाळली.

आरएसएसचे स्वंयसेवक राजेश कुंटे यांनी उच्च न्यायालयात भिंवडी दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका केली होती. गांधी यांनी मार्च 2014 मध्ये भिंवडीमधील एका जाहीर सभेत गांधी हत्येबाबत कथित विधान केले आहे. गांधी यांची हत्येमागे आरएसएसचा सहभाग होता, असे कथित विधान गांधी यांनी केले, असा दावा कुंटे यांनी केला आहे. या भाषणाच्या विरोधात कुंटे यांनी दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. गांधी यांच्या भाषणामुळे संघाची प्रतिमा मलीन झाली, त्यामुळे गांधी यांचे भाषणाच्या प्रती पुरावा म्हणून ग्राह्य धरावे, अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी भिंवडी न्यायालयाने सन 2018 मध्ये नामंजूर केली होती.

याविरोधात कुंटे यांनी उच्च न्यायालयात सन 2019 मध्ये याचिका केली होती. आज न्या रेवती मोहिते-डेरे यांच्या पुढे यावर सुनावणी झाली. न्यायालयाने कुंटे यांची मागणी अमान्य केली आणि याचिका फेटाळली. गांधी यांच्या वतीने याचिकेला विरोध करण्यात आला. याचिका अप्रस्तुत आणि बेकायदेशीरणे मागणी केलेली आहे असा आरोप करण्यात आला. गांधी यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. माझे भाषण जोडतोड करुन आणि चुकिच्या पध्दतीने वापरले आहे, असा बचाव त्यांनी भिंवडी न्यायालयात केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT