Delhi
Delhi 
देश

चीनमधून मालदिवच्या नागरिकांसह 323 भारतीयांना आणले दिल्लीत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या हुएई प्रांतातून आज (रविवार) मालदिवच्या सात नागरिकांसह 323 भारतीयांना मायदेशी आणण्यात आले. नुकतेच 324 जणांना आणले होते. 

याठिकाणी अडकलेल्या 600 भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यास शुक्रवारपासून (ता.31) सुरुवात करण्यात आली होती. यातील पहिली बॅच शनिवारी दाखल झाली. त्यानंतर आज एअर इंडियाच्या विशेष विमानाने यांना भारतात आणण्यात आले. चीनच्या सरकारकडून औपचारिक होकारानंतर या विद्यार्थ्यांना भारतात आणले जात आहे. 

हुवेई प्रांतात सुमारे 1200 भारतीय विद्यार्थी आहेत. कोरोना विषाणूच्या उपद्रवानंतर यातील आतापर्यंत 600 हून अधिक जणांना चीनमधील भारतीय वकिलातीतर्फे मायदेशी येण्यासाठी संपर्क साधण्यात आला होता. त्यांच्यासाठी दोन विशेष विमानेही तयार ठेवण्यात आली होती. तपासणी करून या सर्वांना भारतात आणण्यात आले आहे. भारतात परतल्यानंतर या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीही केली जात आहे. कोणत्याही भारतीय नागरिकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याची आतापर्यंतची माहिती आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

SCROLL FOR NEXT