नवी दिल्ली - देशाच्या बहुतांश भागात कोसळलेला नैऋत्य मोसमी पाऊस पुढील एक-दोन दिवसांत उत्तर भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदा देशात सरासरीपेक्षा नऊ टक्के अधिक पाऊस पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम राजस्थान आणि त्यालगतच्या प्रदेशात पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मॉन्सून २८ तारखेपासून परतीच्या प्रवासाला लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील नऊ राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला, तर इतर राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडला. भारतात एक जून ते ३० सप्टेंबर हा पावसाळा समजला जातो. यंदा मॉन्सूनचे एक जूनलाच केरळमध्ये आगमन झाले होते. जून महिन्यात सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक, तर जुलैमध्ये सरासरीपेक्षा १० टक्के कमी पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने अनेक ठिकाणांना झोडपून काढले. या महिन्यात २७ टक्के अधिक पाऊस कोसळला.
देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कमी पाऊस पडलेली राज्ये
दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर
अधिक पाऊस पडलेली राज्ये
गुजरात, गोवा, तेलंगण, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश
अति पाऊस पडलेले राज्य
सिक्कीम
जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.