देश

पंतप्रधान मोदींना पावसाळी अधिवेशनात अपेक्षा सर्वपक्षीय सहकार्याची

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात संसद सदस्य राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतील. प्रत्येक गोष्टीमध्ये मूल्य वर्धन (व्हॅल्यू अॅडीशन) करण्याचा प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व पक्षांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. 

शेतीविषयक मुद्दे, गोरक्षक, चीनशी ताणलेले संबंध, राष्ट्रपती निवडणूक या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे पावसाळी अधिवेशन होत असल्याने त्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. 
मोदी म्हणाले, "अनेक अंगांनी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकासाठी संसदेतील सर्व पक्षांनी एकजुटता दाखवली." तसेच, जीएसटी म्हणजे गोईंग स्ट्राँग टुगेदर (एकत्रितपणे सक्षम वाटचाल) आहे, असे वर्णन मोदी यांनी केले. 

अधिवदरम्यानच 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांतीची, 'चले जाव' चळवळीची 75 वर्ष होत आहेत. या निमित्ताने संसदेचे सर्व माननीय सदस्य अशीच एकजूट दाखवावी, असे मोदी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पतीच्या हत्येप्रकरणी न्याय मिळत नसल्याने पत्नीची टोकाची कृती; बीडमध्ये खळबळ

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT