देश

पंतप्रधान मोदींना पावसाळी अधिवेशनात अपेक्षा सर्वपक्षीय सहकार्याची

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात संसद सदस्य राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतील. प्रत्येक गोष्टीमध्ये मूल्य वर्धन (व्हॅल्यू अॅडीशन) करण्याचा प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व पक्षांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. 

शेतीविषयक मुद्दे, गोरक्षक, चीनशी ताणलेले संबंध, राष्ट्रपती निवडणूक या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे पावसाळी अधिवेशन होत असल्याने त्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. 
मोदी म्हणाले, "अनेक अंगांनी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकासाठी संसदेतील सर्व पक्षांनी एकजुटता दाखवली." तसेच, जीएसटी म्हणजे गोईंग स्ट्राँग टुगेदर (एकत्रितपणे सक्षम वाटचाल) आहे, असे वर्णन मोदी यांनी केले. 

अधिवदरम्यानच 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांतीची, 'चले जाव' चळवळीची 75 वर्ष होत आहेत. या निमित्ताने संसदेचे सर्व माननीय सदस्य अशीच एकजूट दाखवावी, असे मोदी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT