Mukesh Ambani
Mukesh Ambani File Photo
देश

2030 पर्यंत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असेल भारताची: मुकेश अंबानी

सकाळ डिजिटल टीम

पुणे: पुण्यात सुरू असलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉगमध्ये (AED) रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Mabani) यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत एक महत्त्वाचं विधान केले आहे. मुकेश अंबनी यांनी (Mukesh Ambani) आज बुधवारी असा दावा केलाय की, भारत लवकरच जपानला मागे टाकेल. त्यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की, 2030 पर्यंत भारत जपानला जीडीपीच्या (Japan GDP) संदर्भात मागे टाकेल. यासोबतच भारत आशियातील दुसरी आणि जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था (Largest Economy) बनेल.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुणे इंटरनॅशनल सेंटरचा कार्यक्रम आशिया इकॉनॉमिक डॉयलॉग 2022 (Asia Economic Dialogue) मधील एका चर्चेत भाग घेतला होता. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, येणाऱ्या काळात भारत आणि आशियाची काय परिस्थिती असणार आहे? तेंव्हा त्याचं उत्तर देताना मुकेश अंबाजनी यांनी म्हटलं की, आशियाने गेल्या दोन शतकांपासून खूपच वाईट काळ पाहिला आहे. आता आशियाची वेळ आली आहे आणि 21 वं शतक आशियाचे असेल. ग्लोबल इकॉनॉमीचे (Global Economy) सेंटर आता आशियामध्ये शिफ्ट झालं आहे. आशियाची जीडीपी (Asia GDP) ही इतर जगाच्या तुलनेत सर्वांत जास्त झाला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत बोलताना ते म्हणाले की, भारताचा जीडीपी 2030 पर्यंत जपानपेक्षाही मोठा होईल. यासोबतच भारत अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल. चीनची ग्रोथ स्टोरी जितकी शानदार आहे, तितकीच शानदार भारताची असेल. त्यांनी यासाठी तीन टार्गेट देखील सेट केले आहेत. अंबानींनी म्हटलंय की, भारताने तीन गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. सर्वांत आधी भारताला 10 टक्क्यांहून अधिक ग्रोथ रेटसाठी एनर्जी आऊटपूट वाढवायला हवं. त्यांनी दुसरं काम सांगितलं की, भारताला एनर्जी बास्केटमध्ये क्लीन अँड ग्रीन एनर्जीचे शेअर्स वाढवायला हवेत. तिसरं आणि शेवटचं काम म्हणजे आत्मनिर्भर बनायला हवं. त्यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की पुढील 10-15 वर्षांत भारताची कोळशावरील अवलंबित्व समाप्त होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT