Gujarat Election 2022
Gujarat Election 2022 esakal
देश

Modi Govt: "मोदी सरकारनं रचला पुलवामा, उरी हल्ल्याचा कट"; 'या' नेत्याच्या आरोपांनी खळबळ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पुलवामा आणि उरी हल्ला मोदी सरकारनं घडवून आणला असा गंभीर आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख मुस्तफा कमाल यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी आरोप केला की, या हल्ल्यातील एकाही सैनिकाचा मृतदेह किंवा त्याचे फोटो समोर आलेले नाहीत. कारण हे मृत झालेले सर्व जवान अनुसुचित जाती समुदयाचे होते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुस्तफा कमाल म्हणाले, "हे जवळपास स्पष्ट झालंय की, सन २०१६ मध्ये झालेला उरी हल्ला आणि सन २०१९ मध्ये झालेला पुलवामा हल्ल्याचं कट-कारस्थान केंद्र सरकारनं रचलं होतं. कारण या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या जवानांचे पार्थिव आणि फोटोही अद्याप समोर आलेले नाहीत. जोपर्यंत यामागे कोणाचा हात होता हे समोर येत नाही तोपर्यंत सर्व बोटं सरकारच्या एजन्सीजकडेच जातात"

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

"ज्या अर्थी आपल्याला या हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या ३० ते ४० जवानांचे फोटो आणि पार्थिव मिळालेले नाहीत. त्याअर्थी हे सर्वजण अनुसुचित जाती समुदयातील होते," असा खळबळजनक दावाही मुस्तफा कमाल यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT