venkaiya naydu. 
देश

'जय हिंद' किंवा 'वंदे मातरम' म्हणणं म्हणजे राष्ट्रवाद नाही- व्यंकय्या नायडू

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- राष्ट्रवाद म्हणजे केवळ 'जय हिंद' म्हणणे किंवा 'जन गण मन' गाणे किंवा 'वंदे मातरम' म्हणणे नाही. जय हिंद म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाचा जय होणे आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा त्यांच्या गरजांची काळजी घेतली जाईल. त्यांना पुरेसे अन्न मिळणे, कपडे मिळणे आणि कोणत्याही भेदभावाला सामोरं जावे न लागणे याला राष्ट्रवाद म्हणता येईल, असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.  

नेताजींच्या म्हणण्यानुसार स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय जोखडातून मुक्ती नव्हे, तर संपत्तीचे समान वाटप, जातीभेदाच्या भीती जमीनदोस्त होणे, सामाजिक समानता आणि धार्मिक सहिष्णुता असणे होय. तुम्ही तुमच्या धर्मावर आणि संस्कृतीवर प्रेम करा, पण दुसऱ्यांचा द्वेषही करु नका, असं व्यंकय्या म्हणाले.

फक्त भौगोलिक सीमा म्हणजे देश नाही, तर त्यामध्ये राहणाऱ्या लोकांचे कल्याण महत्त्वाचे आहे, असं नेताजी सुभाष चंद्र बोस म्हणायचे. आपल्याला ऐतिहासिक परंपरा लाभली असून आपल्या संस्कृतीत शेअर आणि केअर महत्त्वाचे आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला 'जग हेच एक कुटुंब' असल्याचे तत्वज्ञान दिले आहे, असंही उपराष्ट्रपती म्हणाले आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT