देश

मतमोजणीत आम्ही हस्तक्षेप करणार नाहीत

वृत्तसंस्था

सर्वोच्च न्यायालय; काँग्रेसची याचिका फेटाळली

नवी दिल्ली: इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्‍वासार्हतेबाबत काँग्रेस पक्ष अद्याप साशंकच असल्याचे दिसून येते. "ईव्हीएम' मतांसोबत व्हीव्हीपॅट यंत्रांतील किमान 20 टक्के चिठ्यांची मोजणी करत त्याची पडताळणी केली जावी, अशी मागणी करणारी काँग्रेसची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाच्या मतदान घेण्याच्या अधिकारावर आम्ही कुरघोडी करू शकत नाही, असे न्यायालयाने सुनावणीवेळी स्पष्ट केले.

न्यायालयाच्या या भूमिकेनंतर काँग्रेसची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी गणनेची मागणी केलेल्या चिठ्यांची संख्या 10 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आणली. पण न्यायालयाने हा युक्तिवादही अमान्य केला. तुम्ही जो दावा करत आहात त्याला पुष्टी देणारे पुरावे सादर करा, निवडणूक आयोगाने निर्धारित केलेली छापील पावत्यांच्या मोजणीची पद्धत बेकायदा, मनमानीपणाची आणि सदोष आहे हे सिद्ध करून दाखवा, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक सुधारणांवर चर्चा करता येऊ शकते, असे सांगत न्यायालयाने काँग्रेसला आपली याचिका मागे घेण्याची परवानगी दिली; तसेच ती नंतर सर्वसमावेशक निवडणूक सुधारणा याचिकेसोबत पुन्हा सादर करण्याचे निर्देशही दिले.

न्यायालयाची विचारणा
गुजरात प्रदेश काँग्रेस समितीने ही याचिका सादर केली होती. यावर न्यायालयाने राजकीय नेते वैयक्तिक क्षमतेवर अशा प्रकारच्या याचिका का सादर करत आहेत, अशी विचारणा करत यासाठी एखादा पक्ष पुढाकार घेत यावर आपले म्हणणे का मांडत नाही, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर काँग्रेसने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

काँग्रेसचा विजयाचा दावा
गुजरात निवडणुकीबाबत मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष काँग्रेसने फेटाळून लावले असून, 182 पैकी 124 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची आज बैठक होऊन तीत हे निष्कर्ष फेटाळण्यात आले. पहिल्या टप्प्यातील 61 आणि दुसऱ्या टप्प्यातील 63 जागा मिळतील, असा विश्‍वास नेत्यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनी तर संभाव्य विजयाचे श्रेय पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांना देऊनही टाकले आहे. दरम्यान राज्यात काल झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मिळाली असून, 68.41 टक्के मतदान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 2012 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 71 होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 7 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT