narendra modi sakal media
देश

‘केंद्र सरकार खरे आकडे लपवतेय’; अर्थमंत्र्यांच्या पतीकडूनच 'घरचा' आहेर

सकाळ डिजिटल टीम

कोरोना महामारीचा दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. दररोज साडेतीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहे. तर जवळपास तीन हजार जणांचा दररोज मृत्यू होतोय. रुग्णालयातील परिस्थिती चिंताजनक होत असून ऑक्सिजन अभावी अनेकांनी प्राण सोडले आहेत. कोरोनामुळे देशात हाहा:कार उडाल्यानंतर आता केंद्र सरकारला लक्ष्य केले जात आहे. देशातील विदारक परिस्थितीवर भाष्य करताना निर्मला सितारामण यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी भाजपावर टीकास्त्र सोडत मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे.

एका अर्थविषयक ऑनलाईन चर्चेदरम्यान अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका करत आपलं मत व्यक्त केले. भारतात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशात सध्या आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने लोकांची मदत करायला हवी. मात्र, केंद्र सरकार हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असल्यां परकला प्रभाकर म्हणाले.

पुढे बोलताना अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर म्हणाले की, 'कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात अतिशय विदरक परस्थिती निर्णाम झाली आहे. या भयावह संकटामुळे लोकांना नोकऱ्या गमावाव्या लागत आहेत. कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात जवळ असणारे पैसे खर्च केल्यामुळे साठवलेले पैसेही संपत आहेत. या आर्थिक नुकसानानंतर पुन्हा उभे राहणं कठीण जात आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1.80 लाख लोकांचा जीव गेलाय. मात्र, सरकार कोरोना रुग्णांचे खरे आकडे सांगत नाही. वास्तवात परिस्थिती यापेक्षा भयानक आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT