देश

"मला राजीनामा का मागितला नाही? नितीश यांनी बिहारचा अपमान केला"

वृत्तसंस्था

पाटणा : "नितीशकुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी फसवणूक केली असून, बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे," अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली. दरम्यान, मी राजीनामा दिला असता असे सांगतानाच तेजस्वी यांनी नवे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्याच विधानाचा दाखला देत नितीश यांनी आतापर्यंत सहावेळा असे केल्याचे सांगितले.

तेजस्वी यांनी सुशीलकुमार मोदी यांचे एक जुने विधान रिट्विट करत नितीश आणि भाजपच्या या राजकीय खेळीवर शाब्दिक कोटी केली.
"नैतिकतेचे कारण देत राजीनामा द्यायचा आणि काही महिन्यांतच पुन्हा सरकारमध्ये सहभागी व्हायचे ही नितीशकुमार यांची जुनी सवय आहे," असे सुशीलकुमार मोदी यांनी फेब्रुवारी 2015 मध्ये ट्विट केले होते.
ते रिट्विट करत तेजस्वी म्हणाले, "अगदी बरोबर. यावेळी नितीश यांनी काही मिनिटांतच हे केलंय. गेल्या बारा वर्षांत नितीश यांनी सहावेळा असे केले आहे."

नितीश कुमार यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यांनी बिहार विधानसभेत आणि नंतर बाहेर माध्यमांशी बोलताना नितीश यांच्यावर टीका केली. आज मी विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले. परंतु, भाजप आणि नितीश कुमार यांच्याकडे त्या प्रश्नांची उत्तरे नव्हती, असे तेजस्वी यांनी सांगितले. 

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा असलेल्या लालुप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी हे बिहारचे उपमुख्यमंत्री होते. मात्र केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांच्याविरोधात एका गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू केल्यानंतर राजद व नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलामधील संघर्ष वाढत गेला.

नितीश यांनी सांगितले असते तर मी राजीनामा देण्याचा विचार केला असता. त्यांनी राजीनामा मागण्याची हिंमत का दाखवली नाही, असा सवालही तेजस्वी यांनी यावेळी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT