No additional DA for Central Govt employees, pensioners till July 2021 
देश

मोठी बातमी : केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या वाढीव महागाई भत्त्याबाबत सरकारचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रिय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२० ते ०१ जुलै २०२१ दरम्यान अतिरिक्त महागाई भत्ता मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने आज जाहीर केले आहे. सध्याचा महागाई भत्ता मात्र चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच, केंद्रिय कर्मचाऱ्यांना DA आणि DR मिळणार नाही. केंद्रिय अर्थमंत्रलयाने ही घोषणा केली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या भत्त्यातली वाचलेली रक्कम ही कोरोना संक्रमित लोकांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार असल्याचेही केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. हा निर्णय केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी, केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल. हा निर्णय केंद्र सरकारच्या एकूण ४८ लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारक कर्मचाऱ्यांवर परिणाम करणार आहे.

दरम्यान, भारतात कोरोनाचे रुग्ण हे दररोज वाढत असून दररोज वाढणारा आकडा हा केंद्र सरकारसाठी चिंतेचा विषय बनत चालला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या 21 हजार 393 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 16 हजार 454 रुग्ण तर रुग्णालयातून उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेले 4 हजार 257 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 681 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT