देश

काश्‍मिरी युवकांवरील हल्ल्यांचे वृत्त निराधार : मोदी

वृत्तसंस्था

टोंक (राजस्थान) : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील विविध भागांत काश्‍मिरी युवकांवर होणाऱ्या हल्ल्यांचे वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी फेटाळून लावले. देशात कोठेही काश्‍मिरी युवकांना लक्ष्य करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. 

राजस्थानमधील टोंक येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले, ""आपला लढा हा दशतवादाविरोधात, मानवतेच्या शत्रूंबरोबर आणि काश्‍मीरसाठी असून काश्‍मिरींविरोधात नाही. देशभरात कोठेही काश्‍मिरी युवकांवर हल्लाची एक जरी घटना घडली तर त्यामुळे "भारत तुझे तुकडे होतील' अशी दर्पोक्ती करणाऱ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पदभार स्वीकारल्यानंतर "भारताबरोबर शांततेसाठी काम करू, अशी ग्वाही पठाणचा मुलगा म्हणून दिली होती. ते त्यांच्या शब्दाला जागतात का हे पाहण्याची आता वेळ आली आहे.'' जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवाद हा केवळ तीन जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे. फुटीरतावाद्यांकडून मिळणारा आश्रय हे त्यामागील कारण आहे, असेही मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

VIDEO: 'मला जाऊ द्या ना घरी..' धकधक गर्ल माधुरीचा वाजले की बारा वर भन्नाट डान्स पण वैष्णवी पाटीलचं होतंय कौतुक, काय आहे कारण ?

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

SCROLL FOR NEXT