देशातील जनतेचा मोदींवर विश्‍वास: भाजप
देशातील जनतेचा मोदींवर विश्‍वास: भाजप 
देश

देशातील जनतेचा मोदींवर विश्‍वास: भाजप

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यावर टीका करत सिब्बल यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज असून देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मिनाक्षी लेखी म्हणाल्या, "आपल्याला सिब्बल यांच्यावर विश्‍वास ठेवण्याची गरज नाही. जर विरोधकांनी सरकारवर विश्‍वास ठेवला तर त्यात काहीतरी चूक आहे असे वाटते.' तसेच देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास असून सिब्बल यांनी राज्यशास्त्र पुन्हा एकदा वाचण्याची गरज असल्याचा सल्लाही दिला. शुक्रवारी सिब्बल यांनी मोदींवर निशाणा साधत "मोदीजी यांनी 80 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांनी हे आश्‍वासन पूर्ण केले आहे का? नाही. दोन वर्षे होऊन गेले. आपण अशा पंतप्रधानावर विश्‍वास ठेवू शकत नाही.' तसेच "केवळ भाषण आणि रिकाम्या आश्‍वासनांवर सरकार चालत नाही' अशी टीकाही सिब्बल यांनी केली होती.

"देशातील 80 कोटी जनतेची कमाई 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांच्याकडे काय काळा पैसा आहे? त्या लोकांचे बॅंकेत खातेही नाही. त्यांच्याकडे काही ओळखपत्रही नाही. त्यामध्ये शेतकऱ्यांकडे कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे, बिहारमधून पंजाबमध्ये आलेले विस्थापित कामगार आहेत. ते 200-500 रुपये कमावतात. त्यांनी काय करायचे? त्यांच्या कुटुंबियांनी काय करायचे?' असे प्रश्‍नही सिब्बल यांनी उपस्थित केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

VIDEO: अजय-अतुलच्या 'वाजले की बारा' गाण्यावर धकधक गर्ल माधुरीचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

SCROLL FOR NEXT