PM Narendra Modi Google
देश

मुगलसरायचे झाले दीनदयाल जंक्शन; बदलली तब्बल 26 रेल्वे स्टेशनची नावे

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी भोपाळमध्ये राणी कमलापति रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले. यांचे नाव पूर्वी हबीबगंज रेलवे स्टेशन होते आता त्याच नामकरण करून राणी कमलापती स्टेशन असे ठेवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात तब्बल 26 रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात आलेले आहे.

आतापर्यंत महत्त्वाच्या 10 स्टेशनची नावे बदलण्यात आली आहे. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील पाच रेल्वे स्टेशनची नावे बदलण्यात आली आहेत. यूपीमध्ये फैजाबाद रेल्वे स्टेशनचं नाव बदलून अयोध्या कॅंट असे ठेवण्यात आले आहे. मुगलसराय जंक्शनचे नाव दीनदयाल उपाध्याय जंक्शन केले आहे. अलाहाबाद जंक्शनचे नाव बदलून प्रयागराज जंक्शन ठेवण्यात आले आहे. याबरोबरच मंडुआडीह रेल्वे स्टेशनचं नाव बदलून बनारस रेल्वे स्टेशन ठेवण्यात आले आहे. तर दांदूपुर रेल्वे स्टेशनचं नाव बदलून वराही देवी धाम रेल्वे स्टेशन असे बदलण्यात आले आहे.

कर्नाटकातील बेंगलोर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून क्रांतीवीर संगोली रायन्ना रेल्वे स्टेशन केले आहे. त्याचबरोबर गुलबर्गा रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कलबुर्गी रेल्वे स्टेशन केले आहे. महाराष्ट्रात ओशिवारा रेल्वे स्टेशनचं नाव बदलून राम मंदिर रेल्वे स्टेशन केले. त्याच्याबरोबरच एलफिंस्टन रेल्वे स्टेशनचे नाव बदलून प्रभादेवी रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात आले आहे.

भारतीय रेल्वे कोणत्याही रेल्वे स्टेशनच्या नाम करणात सहभागी होत नाही. राज्य सरकारच्या अधिकारात नाव बदलले जाते.अशावेळी राज्य सरकार केंद्रीय गृहमंत्रालय आणि नोडल मंत्रालयाकडे विनंती पाठवतात. येथून मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकांची नावे बदलली जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT